पश्चिम बंगाल- कोलकाता 2016 मध्ये, शाळा सेवा आयोगाने IX-XII स्तराची शिक्षक भरती परीक्षा घेतली होती . गुणवत्ता यादी प्रसिद्ध न केल्यामुळे; 1:1.4 च्या प्रमाणात राजपत्राचे उल्लंघन केले गेले. यामध्ये काही उमेदवारांची एसएमएसद्वारे बेकायदेशीर भरती करण्यात आली होती. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-लोकसेवा-आयोगाकडून-सरळस
शिक्षक भरतीतील भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ, गुणवत्ता यादीपासून वंचित राहिलेल्या उमेदवारांनी 2019 मध्ये कोलकाता प्रेस क्लबसमोर 29 दिवस उपोषण सुरू ठेवले होते..भ्रष्टाचाराची माहिती मिळाल्यानंतर पश्चिम बंगालच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व शिक्षक भरती नोकरीच्या वंचित उमेदवारांना गुणवत्ता यादीत भरती करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे, 2021 मध्ये, उच्च न्यायालयाच्या परवानगीने, सॉल्ट लेक सेंट्रल पार्क गेट नं.जवळ 187 दिवसांचे आंदोलन करण्यात आले. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-मुंबईतल्या-सुप्रसिद्ध/
त्यावेळीही भरतीचे आश्वासन मिळाले दिले गेले परंतु त्याची अद्यापही अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे या उमेदवारांनी 8 ऑक्टोबर 2021 पासून गांधी पुतळ्यासमोर अनिश्चित काळासाठी धरणे सुरू केले. तीन कालावधीमध्ये एकूण 600 दिवस ही चळवळ चालू आहे . 8000 हून अधिक बनावट भरती उघडकीस आली असली तरीही आजवर वंचित उमेदवारांना न्याय मिळालेला नाही.
मेरिट लिस्टेमध्ये असूनही वंचित नोकरी साधक पार्थ प्रतिमा मंडळ,चंदन प्रधान, पिनाकी घोष, लक्ष्मी पॉल,सुदीप मंडल म्हणाले कि,”आम्हाला आशा आहे , गुणवत्ता यादीत समाविष्ट असलेल्या सर्व वंचित नोकरी शोधकांना माननीय उच्च न्यायालय आणि मानवतावादी सरकारच्या देखरेखीखाली लवकरच नियुक्ती पत्र मिळेल. सरकारने सर्व वंचित नोकरी शोधणार्यां -साठी सुमारे 15000 सुपर न्युमरिकल पदे निर्माण केली आहेत. माननीय उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाने आणि शासनाच्या सदिच्छाने सर्व वंचित नोकऱ्या इच्छुकांना लवकरात लवकर नियुक्ती देऊन न्याय मिळेल, अशी त्यांना आशा आहे.

